मोठी बातमी : 15 ऑगस्टपासून चारचाकी वाहनांना टोल सवलत; जाणून घ्या योजनेचे तपशील व फायदे

Big Relief for Motorists : १५ ऑगस्टपासून सोलापूरसह देशभरातील बिगर व्यावसायिक (कार) वाहनचालकांना टोल प्रवासात मोठी सवलत मिळणार आहे. केवळ ३,००० रुपये एकदाच भरून तुम्ही वर्षभरात २०० टोल फेऱ्या (एक टोल = एक फेरी) सवलतीच्या दरात करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सवलतीची मुख्य वैशिष्ट्ये

  • ही सुविधा फक्त बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी लागू आहे.
  • ३,००० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर २०० फेऱ्यांपर्यंत सवलत मिळेल.
  • एकदा पैसे भरल्यानंतर ही सवलत देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावर लागू राहील.
  • फास्टॅग असणे बंधनकारक; फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागेल.
  • व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनांना ही सवलत मिळणार नाही.

सध्याचे टोल दर

  • फास्टॅग असलेल्या चारचाकी वाहनांसाठी एकमार्गी टोल ₹७५.
  • २४ तासांच्या आत परत आल्यास परतीच्या प्रवासासाठी ₹३५ टोल.
  • २४ तासांनंतर परत आल्यास पुन्हा ₹७५ आकारला जातो.
  • फास्टॅग नसल्यास एकमार्गी प्रवासाचा टोल ₹१५०.

बचतीचा हिशोब

आत्ताच्या दरांनुसार २०० फेऱ्यांसाठी एका कारचालकाला सुमारे ₹११,००० टोल भरावा लागतो. नव्या योजनेमुळे हेच प्रवास केवळ ₹३,००० मध्ये होऊ शकतील. म्हणजेच किमान ₹८,००० ची बचत होणार आहे. तसेच आता २४ तासांच्या मर्यादेची अट राहणार नाही.

सवलत कशी मिळवावी?

  1. आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधील Google Play Store उघडा.
  2. “Rajmarg Yatra – NHAI” हे अॅप डाउनलोड करा.
  3. अॅपवर लॉगिन करून वाहन क्रमांक टाका.
  4. ₹३,००० चे पेमेंट करा.
  5. पेमेंट पूर्ण झाल्यावर सवलत तत्काळ लागू होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment